Friday 20 May 2016

फरक करता यायला हवा


"फरक करता यायला हवा"

काय हो, तुम्हाला असं नाही वाटत कधी की, आपण फारच अघळपघळ वागतो. म्हणजे आपल्या विचारांमध्ये 'स्पेसिफिक' अस् जरा कमीच् आहे म्हणुन ?(अस् म्हणतात की, आपल् मागणं जर् स्पेसिफिक नसेल, तर देव पण ते पुर्ण करंत नाही.. पण असो, तो जरा दूसरा विषय आहे.)
म्हणजे विचारांमध्ये असं 'ठराविकपणं' येण्यासाठी काही सारख्या, समानार्थी भासणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक करता यायला हवां, असं मला वाटतं.
आता हेच पाहाना.. हुशारी आणि शहांणपणं हे दोन शब्द वरवर जरी एकच वाटले, तरी हुशारी ही अभ्यासापुरतीच मर्यादीत ठेवता यायला हवी.. तिचा उपयोग मित्रांसमोर करण्यात काहीच अर्थ नाही. मित्रांबरोबर वागताना शहाणपणंचं कामाला येतं.
आता मित्रांचा विषय निघालाच् आहे तर, (खुष मस्करे) दोस्त आणि खरे मित्र( हे फार्फार तर 2,3 असतात.) हयात ही फरक करता यायला हवा. सगळ्यांना ह्याचा अनुभव असेलच्.( संकट काळी मदत करतो, तोच खरा मित्र, असं म्हणतात ते उगाच् नाही. असो.)
जे सध्या शिकत आहेत, किंवा सध्या पोटार्थी काही काम करत आहेत, त्यांना जॉब आणि करियर हयात फरक करता यायला हवा, म्हणजे पुढे जाऊन होणारी घुसमट टाळता येईल.
आणि हो, काम करताना होणारी दगदग् व घ्यावी लागणारी मेहनत, हयात ही फरक करता यायला हवा. कारण सध्याच्या जगात इलेक्ट्रॉनिक्स मुळे 'मेहनत' अशी ही उरलीच नाहीये. आहे ती फक्त दगदग. कदाचित्, त्यामुळेच आपण अपेक्षित मेहनत न केल्यामुळे अपेक्षित 'फळ' मिळत नसेलं. म्हणून दगदग आणि मेहनत हयात फरक करायला हवा.
इलेक्ट्रॉनिक्स मुळे माहितीचा खजिना आपल्या बोटांवर नाचतोय सध्या..(पूर्वी जिभेवर सरस्वती नाचायची.काळाचा महिमा, दुसरं काही नाही. असो.) पण महत्व त्यालाचं असतं, जो ज्ञानी आहे. त्यामुळे माहिती आणि ज्ञान हयात फरक हा करता यायलाच हवा.
(आणि माहितीला ज्ञानामध्ये 'कन्वर्ट' करता यायला हवं.)
काम करतानाही, मग ते कोणतही असू दे, कामात 'बिझी'असणं आणि 'खरंच काम करणं' हयात फरक करता यायला हवा.. कारण,आपण जेव्हा मी बिझी आहे, अस् म्हणतो, तेव्हा बऱ्याच वेळेला आपण स्वतः चीच खोटी समजूत काढत असतो.( लहानपणी नाही का, आपण दिवसभर अभ्यासामध्ये बिझी असायचो, पण डोक्यात फार कमी शिरायच्, तसचं. असो.).. (हे 'असो, असो' फारच होतय् का आज? असो). म्हणून पुढच्यावेळी आपण बिझी आहोत का खरचं काम करतोय हयात फरक करायला हवा.
स्वैराचार आणि स्वातंत्र्य हा अगदी चोथा झालेला विषय आहे. पण म्हणजे नेमकं काय? हे कोणाला नीटसं माहिती नसल्यामुळे आपल् वागण् कशात मोडतं, ह्याच आकलन बऱ्याच जणांना होत नाही.
स्वैराचार म्हणजे बुद्धि न वापरता, इतरांच्या भावनांची दखल न घेता केलेलं कृत्य.. तर स्वातंत्र्य म्हणजे ''Courage with Consideration".
त्यामुळे देशाचे नागरिक म्हणून वावरताना स्वैराचार आणि स्वातंत्र्य हयात फरक करता यायला हवा.
सध्या इथेच थांबतो. उर्वरीत पुढील ब्लॉग मधे..

खरा पराभव

"खरा पराभव" 
..शेवटी एकदाची ती उपांत्य पूर्व फेरीची टेनिस मॅच संपली.
त्याला बराच झुंजाव लागलं , पण शेवटी तो हरलाच.खर पाहता, तो जिंकायला हवा होता. कारण तो नॅशनल लेवल वरचा चॅम्पियन होता, अन् प्रतिस्पर्धी तर अगदीच नवखा होता. पण प्रतिस्पर्ध्याने अगदी मनापासून खेळ केला.
प्रथेप्रमाणे प्रतिस्पर्ध्याने सामना संपल्यावर शेक-हॅंड साठी हात पुढे केला, पण त्याने तो झिडकारला. हरणं फारच जिव्हारी लागल होत त्याच्या..
प्रशिक्षक समोर येताच त्याचा स्वतः वरचा ताबा सुटला. हातातली लकी रॅकेट फेकून त्याने आरडाओरडीला सुरुवात केली.. " मी हरुच् कसा शकतो? त्याची लायकी तरी होती का, माझ्या समोर उभं राहण्याची? अन् चालला मला शेक- हॅंड करायला..खर तर माझीच जास्त लायकी आहे सेमी फायनल ला खेळण्याची.. हे असं नेहमी माझ्या सोबतच् का होत नेहमी.. देव पण मलाच असली शिक्षा का देतो? पहा कसा मिरवतोय तो जिंकल्यावर्.. पुढे जावून नक्कीच हरणार तो.. माझा शाप आहे त्याला.. सर, खर तर तुमचीच चूक आहे ही.. तुम्हीच नीट प्रॅक्टीस करून घेतली नसणार माझ्याकडून, म्हणून तर मी हरलो ना.. नाहीतर मी हरुच् शकत नाही.अन् मला सांगा, तुम्ही त्याच अभिनंदनच का केलतं?”
असचं काही बाही बडबडत् सुटला तो..
अन् इथेच खराखुरा पराभव झाला त्याचा.. "हरणं" हा खेळाचाच एक भाग असतो, हे त्याने समजून घेतलचं नाही.. एका हरण्याने आयुष्य थांबत नाही, हे तो शिकलाच नव्हता..
त्यासाठी स्वत:च नुकसान देखील त्याने करून घेतल होतं.
खेळावरच्या प्रेमापेक्षा, हरण्यावरच्या रागाला त्याने जास्त महत्त्व दिलं.

स्थायीभाव

"स्थायीभाव"
..गेले काही दिवस त्याच्या मनाची जीवघेणी घालमेल होतं होती. कशातच् लक्ष लागत नव्हतं.
एकच प्रश्न वारंवार छळत् होता..
"मी इतकं प्रेम केल् तिच्यावर.. इतका जीव लावला तिला.. तिने झिडकारल् आपल्याला, तरी अजूनही आपण तिच्यावर इतकं बेफाम, आणि खरं प्रेम कस् करू शकतोय? "का"?? तगमग झाली होती त्याच्या जीवाची..
तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने आशेनी पाहिलं, पण नंबर मित्राचा होता. वाटल, नको उचलायला. पण सवयीने फोन उचलला.
"अरे सॉरी.. काल तूला मला तिच्याबद्दल सांगायच होतं, पण मला खरंच वेळ नव्हता.. आता परत भेटल्यावर सांग. बरं.. माझ एक काम होत रे तुझ्याकडे..
" माझ्याकडे संध्याकाळी एक क्लायंट येतोय.. त्याला प्रेझेंटेशन द्यायचय.. मग तेवढा एक प्रोजेक्ट रिपोर्ट करून देना.. मी डिटेल्स मेल करतो." मित्राच् कालचं वागण् आठवूण तो त्याला नकार देवु शकत होता, पण त्याने मदत करायला हवी असा निर्णय त्याच्या मनाने नकळतच घेऊन टाकला. फोन वरच थोडी बहुत माहिती विचारली.
"बरं. दे पाठवून. मी करतो."
होकार देऊन त्याने फोन ठेवला, अन् अचानक त्याला त्याच्या वागण्याच् कारण गवसल्..अन् मन हलक हलक झालं.
तगमग संपली, मनात एक आनंद भरून वाहु लागला. तिच्यावर अस् भरभरुन प्रेम का केल्, ह्याच उत्तर मिळालं.
जगाने त्याला कसंही वागवलं, तरी जगाशी चांगलचं वागण् हा त्याचा स्थायीभाव होता. इतरांना मदत करण, हे जसं त्याच्या आतून येत होत, तसंच तिच्यावरच प्रेम आतून आल होत.
त्याच् अस् निस्वार्थ,बेफाम 'खरं प्रेम' करता येणं हे तिचं कतृत्व नव्हतं, तर ह्याचाच तो स्वभावगुण होता.. देवासारखा.. दोष दिला तरी कृपा करणारा. मग तो फक्त कामापूरता आठवण काढणारा मित्र असो, की एक सोयीचा खांदा म्हणून बघणारी मैत्रीण असो.. हा सर्वांशी चांगलच् वागणार होता, सर्वांवर प्रेम करणार होता.
आपल् हे वागणचं खरं आहे, हाच आपला स्थायीभाव आहे, हे जाणून मित्राच्या मेल ची वाट पाहु लागला.

Monday 2 May 2016

निर्णयक्षमता

.....
...   योग्य निर्णय कसा घ्यायचा हा आपल्या सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाच उत्तर मला कसं मिळाल, ह्याचा हा अनुभव..
ह्या गोष्टीचा शेवट झाला तो "स्वामी समर्थ" केंद्रात..
काही दिवसांपूर्वी माधव माझ्याकडे आला होता. बऱ्याच दिवसांपासून माझी अन् त्याची भेट झाली नव्हती.. पण तो मला नेहमी आपण भेटुयात, मला बोलायच् आहे, असा फोन करुन म्हणायचा. शेवटी आज आमची भेट झाली.
मी स्वामी समर्थ केंद्रात निघालो होतो. त्यालाही मी सोबत घेतलं. तिथे गेल्यावर दर्शन घेवून मीच त्याला बोलत केलं. त्याच्या वयाच्या, म्हणजे 25 वर्षाच्या मुलाचा जो प्रश्न असतो, तोच ,म्हणजे करियर संबधित होता. माधव जरा त्रस्त झाला होता. त्याचं शिक्षण पोस्ट ग्रॅजुएट पर्यंत झालं होतं.
पण त्याला कळत नव्हतं की पुढे काय करावं? म्हणून तो मला भेटायला आला होता.
"दादा" माधवने सांगायला सुरुवात केली. " मला निर्णय घेता येत नाहीये की, मी नेमकं काय करावं? घरचे मागे लागलेत, मी लवकरात लवकर माझ करियर सुरु कराव म्हणून .."
"म्हणजे?" मी विचारलं.
"दादा, तुला माहितीये की, मी पोस्ट ग्रॅजुअशन बरोबर गाण्याच् ही शिक्षण घेतलय. अन् मला आता कळत नाहीये की, मी एखादी कंपनी जॉइन करावी का गाण्यातचं मला सिद्ध कराव्?"
"तुझा कल कशाकडे आहे"?
"सध्या माझा कल दोन्हीकडे आहे. जर मी कंपनी जॉइन केली तर, मी भरपूर पैसे कमवु शकेन, माझी स्वप्न पूर्ण करू शकेल..ह्या मिड्ल क्लास लाइफ मधून लवकर सुटता येईल.. समाजात एक स्टेटस निर्माण होईलं, अन् लग्न ही लवकर जमेलं."
".......
"अन् गाण्यात करियर करायच म्हंटल, तर खुप स्ट्रगल करावा लागेल. सगळ अनिश्चित्त वातावरण असणार.. पण गाण मला मनापासून आवडतं. तुम्हीच सांगा मी काय निर्णय घेवू?"
खरंच ह्या प्रश्नाच् उत्तर देण जरा अवघड होत. कारण दुसऱ्या कोणाने सुचवलेल करियर तिसऱ्याने कराव्, ह्या मताचा मी नाहीये. आपला निर्णय आपणच घ्यायचा असतो, हे माधवला कसं समजाव ह्याचा विचार मी करू लागलो. मी केंद्रात आजु बाजूला नजर फिरवली.. अन् मला माधव च्या प्रश्नाच् उत्तर मिळालं.
मी माधवला समोर काय दिसतयं ह्याच वर्णन करायला सांगितल. जरा विचित्र पणे माझ्याकडे पाहून तो वर्णन करू लागला..
"काही माणसं स्वामींच्या तस्वीरी समोर बसून पठण करतायेत्.. काही औदुंबराला फेऱ्या घालत आहेतं."
"अन् ती लहान लहान मुलं आहेत, ती काय करत आहेत"?
"ती.. कुत्र्यांच्या लहान पिलां बरोबर खेळताहेत.."
"आता मला सांग.. पिलांबरोबर खेळणारी लहान मुलं आणि देवासमोर बसलेली प्रौढ़ माणस, ह्यांच्यात जास्त आनंदी, समाधानी कोण दिसतय तुला"?
"एक मिनिट दादा. मला जरा निरिक्षण करू दे".
"अरे दादा, मुलं आणि मोठी माणसं, दोघही समाधानी आणि आनंदी आहेतं"
"हेच तुझ्या प्रश्नाच् उत्तर आहे माधव. तू स्वतःला ह्यापैकी एका ग्रुप मधे ठेव. हे दोन्ही ग्रुप आपली आपली काम करत आहेत."
" लहान मूलं, आपण मंदिरात आलोय, म्हणून शांत न बसता, त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागत आहेत, तर मोठी माणसं त्यांचा स्वभावा नुसार वागत् आहेत."
"तुही तुझ् करियर असंच निवड. ज्यात तुला अधिक आनंद भेटेल. क्षणिक समाधान न मिळता, टिकणार समाधान तुला कशात आहे, ह्याचा आधी विचार कर. आणि मगच् निर्णय घे. ह्यात इतर मित्र काय म्हणतील, ह्यापेक्षा तुला आणि तुझ्या घरच्यांच्या आनंदाचा विचार कर्. तुला निर्णय घेण् सोप जाईल."
माधव ला त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर मिळाल होतं. लवकरच विचार करून, घेतलेला निर्णय कळवण्याच वचन देवून माधव समाधनाने गेला. त्याच्या निर्णयाची वाट मी बघतोय.
श्री स्वामी समर्थांनी मार्गदर्शन करून आम्हा दोघांनाही पुढच्या आयुष्यभरासाठी निर्णय क्षमता दिली होती.
(काही संदर्भ वगळता, ही कथा बऱ्याच अंशी सत्य आहे.)
गौरव नायगांवकर.